महाभारतात श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला विराट रूप दाखवलं. संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवलं. तेव्हा अर्जुन म्हणाला, "देवा, या विश्वात इतकं वाईट चाललंय. इतकी वाईट माणसे आहेत. तर मग हे जग कसं काय शाबूत आहे." त्यावर कृष्ण म्हणाला, "या जगात जशी वाईट माणसे आहेत तशी काही चांगली माणसे सुद्धा आहेत ज्यांच्या मुळे हे संपूर्ण विश्व चांगलं चाललय, शाबूत आहे." आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आजचे उत्सवमूर्ती हे या चांगल्या माणसांपैकीच एक! बाप म्हटल की कायम कुटुंबासोबत असणारा आधाराचा हात दिसतो. ज्यांनी दिवस रात्र काम करावं, गरज पडली तर कुटुंबापासून दूर राहावं, अतोनात मेहनत करून स्वतःची स्वप्न बाजूला सारून फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात हे आमच्या आधीच्या जवळपास सगळ्या पिढ्यांच समीकरण. हल्लीची पिढी बाबाशी मैत्रीपूर्ण वागते, बाबाला अरे तुरे करते, प्रसंगी हक्काने भांडते, उलट बोलते. आमच्या पिढीने बाबांना नेहमी आदरयुक्त भीतीने पाहिले आहे. त्यांच्या नजरेत, आवाजात कायम जरब पाहिली आहे. प्रसंगी प्रेम आणि वेळोवेळी धाक पाहिला आहे. ही पिढी कदाचित मैत्रीपूर्ण नव्हती पण त्यांचे संस्
रणझुंजार स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन एखाद्या ठीपक्या एवढं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो पटींनी त्यांच्या हयातीत वाढवलं. त्यावेळी एवढ्या बलाढ्य शाह्या फोफावलेल्या असताना स्वराज्य स्थापनेचा विचार करण हे सुद्धा धाडसाचं होत. या कार्यात त्यांना कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागला. कितीतरी धाडसी प्रसंगाना समोर जावं लागलं. स्वतःची दुःख बाजूला सारावी लागली. अफजलखानच संकट स्वराज्यावर घोंगावत असताना त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई आपल्या लहान संभाजी राजांना जिजाऊंकडे सोपाऊन हे जग सोडून निघून गेल्या. त्यानंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यात फक्त संघर्षच लिहिला होता. पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या सोयराबाईनी सत्तेच्या हव्यासापोटी संभाजी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, हबशी यांच्यासोबत लढता लढता त्यांच्यावर स्वकियांशीसुद्धा लढण्याची वेळ येऊन ठेपली. त्यांच्या कारकिर्दीची ९ वर्ष त्यांना फक्त लढतच राहावं लागलं. त्यांनी कोणत्याही परिस्थिती हार मानली नाही आणि निकराने लढा दिला. या गोष्टीचा स्वतः औरंगजेबाला इतका त्रास झाला कि तो भलेमोठे सैन्य घेऊन स्वतः स